प्रत्येक संध्याकाळ
अशी का येते?
आपल्या भारलेल्या हातांनी
मला कवेत घेते
मी हरवतो
मी बदलतो
सारे काही गमावतो...
हताश आणि उदास असताना ती येते
निःशब्द चिंतेची भरजरी शाल लपेटून
गूढ स्मित ओठावर खेळवत
अन मी मलाच शोधतो
वाटतं,
इथेच कुठेतरी सापडेन "मी"
अस्तित्वहीन तर नक्कीच नसेन!
तीरप्या किरणांमधले धुलीकण
मला माझ्यासारखे वाटतात
दिशाहीन,
वाट चुकून भरकटलेले
वाऱ्याच्या हातातले बाहूलं बनलेले
गडद होत चाललेल्या वातावरणात
मी विरतो..
मंद वाहणारी,वाऱ्याची झुळूक सुध्दा थांबते
मी कासाविस होतो
पाणी...पाणी...पाणी
फक्त थेंबभरच हो!
घरट्याकडे परतणारे पक्षी मला हसतात
त्यांना वाटतं,
मी एक वेडा
घराकडे न परतता भटकणारा!
सावल्या दूरवर पोहचलेल्या असतात
मी मात्र असतो
आहे तिथेच
आहे तसाच...
...... दिनेश गिरप
Monday, April 16, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)


1 comments:
hi mala sagkyat jast aavadali.tujha patta asata,tar mastpaiki marathit 1 lamblachak patrach lihile asate;pan thik aahe.dudhachi tahan takavar bhagavtey ase samaj.
Post a Comment